मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न

मुख्याध्यापकांच्या विक्रमी उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आश्वासक वातावरणात महाराष्ट्र राज्य  मुख्याध्यापक महामंडळाचे  63 वे वार्षिक अधिवेशन संपन्न.

महामंडळ वार्ता-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबईचे 63 व्या वार्षिक अधिवेशन दापोली जिल्हा रत्नागिरी येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहामध्ये दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांच्या विक्रमी प्रतिसादा बरोबरच शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांच्या विचार मंथनासोबत शिक्षण क्षेत्रात येऊ घातलेल्या बदलांवर चर्चा त्याचबरोबर शासन स्तरावरील मंत्री महोदयांच्या उपस्थितीने व त्यांनी दिलेल्या ग्वाहीने शिक्षण क्षेत्रातील प्रश्न बाबत आश्वासक वातावरणामध्ये पार पडले.

दिनांक 12 व 13 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे 63 वे वार्षिक अधिवेशन दापोली येथे  पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बांधवांनी विक्रमी उपस्थिती लावली. त्या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सध्या भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची चर्चा व उहापोह करण्यात आला. त्यामध्ये जुनी पेन्शन योजना, टप्प्यावरील शाळांच्या अनुदान, संच मान्यतेचे बदललेले निकष त्यामुळे कमी होणारी शिक्षक संख्या यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

महामंडळाच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या विषयांवर 2 शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापकांसाठी महाराष्ट्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची उपस्थिती आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठीशी उभे राहण्याची दिलेले आश्वासन ही बाब सुद्धा अधिवेशनामध्ये लक्षवेधी ठरली.

अधिवेशनाची वैशिष्ट्ये 

  • महाराष्ट्रातील मुख्याध्यापक बंधू-भगिनींचा विक्रमी प्रतिसाद. 
  • राज्य मंत्रिमंडळातील उद्योग मंत्री नामदार उदय सामंत व नामदार योगेश दादा कदम त्याचबरोबर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उपस्थिती.
  • संच मान्यता बदललेल्या निकषानुसार होणाऱ्या परिणामावर गंभीर चिंतन व त्याबाबत मंत्रिमहोदयासोबत आश्वासक चर्चा. 
  • 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना बाबत मंत्री महोदयांसोबत चर्चा .
  • शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व विचार मंथन 
  • नवीन येणाऱ्या बदलांबाबत उद्बोधक चर्चा.
  • डॉक्टर बी एम हिर्डेकर यांचे नवीन शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकाची भूमिका या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन.
  • महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न व गुणवत्ता संवर्धन या दोन विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण.
  • शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या 52 मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानन

अधिवेशनाचा शुभारंभ  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ मुंबईचे 63 व्या वार्षिक अधिवेशनाचा शुभारंभ 

  


अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित सर अहिल्यानगर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने सोलापूर, कार्याध्यक्ष आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर पुणे, उपाध्यक्ष सचिन नलवडे सातारा, डॉ. डी एस घुगरे कोल्हापूर, आर.व्ही.पाटील धुळे, मार्गदर्शक सुभाष माने सोलापूर, अरुण थोरात पुणे, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला,सचिव महेश पाटकर व राज्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले,

उद्घाटन व द्वीप प्रज्वलन 



उपस्थितांचे स्वागत महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने  यांनी केले.


आपल्या उद्घाटनपार भाषणामध्ये महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने -सोलापूर यांनी या अधिवेशनाचा उद्देश विशद करून संघटनात्मक पातळीवर गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा आढावा सादर केला. संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये ज्या प्रश्नांची सोडवणूक झाली त्याची माहिती दिली त्याचबरोबर ज्या प्रश्नांवरती काम सुरू आहे त्याची माहिती सादर केली. संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी अनेक प्रश्न मांडून त्याची सोडवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण मंत्री, राज्य मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त यांच्यासोबत शैक्षणिक प्रश्नावर झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी सादर केला. आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.

अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित यांचा महामंडळाच्या वतीने सपत्नीक सत्कार 


महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित अहिल्यानगर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर माजी अध्यक्ष विजय पाटील यांचा विद्यमान अधिवेशन अध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिवेशन अध्यक्षांचे मनोगत


अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित यांनी सध्या शिक्षण क्षेत्रासमोर असलेल्या विविध समस्यांचा आढावा त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारताला महाशक्ती बनवण्यासाठी पूरक असा अभ्यासक्रम शाळांमधून शिकवला जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षणात अनेक प्रयोग सुरू आहेत पण शिक्षकांना शिकवू द्यावे तरच उद्याचा समर्थ भारत घडेल त्याचबरोबर केवळ कार्यक्रमांची संख्या वाढवून उपयोग नाही तर कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शासनामार्फत शिक्षणावर खर्चाचे प्रमाण प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले कारण शिक्षणासाठी झालेला खर्च हा भावी पिढीसाठी गुंतवणूक असते असे ते म्हणाले.

शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू -  ना. योगेशदादा कदम



अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्यमंत्री गृह, महसूल ,ग्रामीण विकास व पंचायती राज,अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन ना. योगेशदादा कदम यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात कोकण भूमीत सर्वांचे स्वागत करून आपण संस्थाचालक असल्याने शाळांच्या समस्या आपल्याला माहीत असून त्या समस्या सोडवण्यासाठी मुख्याध्यापक महामंडळाच्या पाठीशी ठामपणे राहू तसेच नवीन संच मान्यता निकष मुळे कोणती शाळा बंद पडणार नाही याची खबरदारी घेऊ याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून निश्चितपणे यासाठी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.

शोधनिबंध १ :- महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न : केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ तुलनात्मक अभ्यास . सादरकर्ते कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ


कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात : राज्य केंद्रीय  मंडळ तुलनात्मक अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करण्यात आला. सदर शोधणेबंधाचे वाचन कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी केले. या शोधनिबंधाला उपस्थित मुख्याध्यापकांनी  उस्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर झालेल्या चर्चेमध्ये मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन शंकांचे निरसन करून घेतले.
या सत्राचे चेअरपर्सन मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे के पाटील जळगाव यांनी याबाबत मुख्याध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन हा पॅटर्न लागू करत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

शोधनिबंध २ :-  गुणवत्ता संवर्धन अभियान,  सादर करते पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ.



पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवत्ता संवर्धन अभियान या विषयावरती शोधनिबंध सादर करण्यात आला.सदर शोध निबंध पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता प्रसाद गायकवाड यांनी सादर केला. यावर्षी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे गुणवत्ता संवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्याबाबतची माहिती या शोधनिबंधातून देण्यात आली. उपस्थित मुख्याध्यापकांनी या शोधनिबंधाला चांगला प्रतिसाद दिला. अनेक उपक्रमावरती चर्चा झाली.

यानंतर पुणे जिल्हा परिषद मार्फत हे अभियान राबवणारे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.



यानंतर या सत्राचे चेअरपर्सन महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात पुणे  यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघानीआपल्या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची कामे करणारा थिंकटॅंक तयार करावा. त्या माध्यमातून भविष्यात येणारे मुख्याध्यापक तयार होतील आणि शिक्षण गुणवत्ता पूर्ण होण्यास मदत होईल असे सांगितले.


नवीन शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापकांनी 21 व्या शतकातल्या मुख्याध्यापकांसाठी आवश्यक असणारी कौशल्य आणि तंत्रे आत्मसात करणे आवश्यक आहे - डॉ. बी.एम. हिर्डेकर


या अधिवेशनामध्ये मुख्याध्यापकांसाठी विविध बौद्धिक विषयांची रेलचेल होती. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक, डी वाय पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर बी.एम.  हिर्डेकर  यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि मुख्याध्यापकांची भूमिका या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन झाले. उपस्थित मुख्याध्यापक बंधू भगिनींनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आनंद लुटला.त्यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक मुख्याध्यापकांनी उत्कृष्ट अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक प्रेरणादायी व्याख्यान ऐकायला मिळाल्याचे सांगितले

विविध संघटनांच्या पाठिंबामुळेच मी आमदार म्हणूनच मराठी माध्यमांच्या शाळा वाचवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील - आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे.


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे कार्याध्यक्ष आणि कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे बोलताना म्हणाले गेल्या दोन वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांची यशस्वी सोडवणूक केली आहे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना आणि टप्प्यावरील शाळांना अनुदान हे दोन प्रश्न प्रामुख्याने आपल्या अजेंडावर आहे. इतरही प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असून नवीन संच मान्यता जीआर निकष बदलण्यासाठी निश्चित प्रयत्न करू.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ ही शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना व घटकांचे पालकत्व स्वीकारलेली संघटना - सुभाष माने


महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ हे शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांचे व सर्व  घटकांचे पालकत्व स्वीकारली संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले असून भविष्यातील ही संघटना सर्व क्षेत्रातील  घटकांसाठी काम करेल असे प्रतिपादन महामंडळाचे मार्गदर्शक आणि माजी  अध्यक्ष सुभाष माने यांनी केले.

संच मान्यता निकषांमध्ये बदल करण्यासाठी मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून शाळा वाचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे  करू - नामदार उदय सामंत



नवीन संच मान्यता निकषामुळे कोकण आणि दुर्गम भागातील शाळांना मोठा फटका बसणार असून याबाबत शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे निकष बदलण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार  उदय सामंत यांनी केले. टप्पा अनुदान, जुनी पेन्शन योजना यासारख्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्नावर सरकार काम करत असून यातूनही मार्ग काढला जाईल असे ते म्हणाले.

मुख्याध्यापक सन्मान

या अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 53 मुख्याध्यापकांना मंत्री उदय सामंत, योगे दादा कदम यांच्या हस्ते व महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


महामंडळाच्या अधिवेशन खर्चासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाला  निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. सदरचा धनादेश रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला व महामंडळाचे कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी महामंडळाच्स्वीकारला.

महामंडळाच्या अधिवेशनासाठी मुख्याध्यापकांची विक्रमी उपस्थिती


अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांनी विक्रमी उपस्थिती नोंदवली. कोकण कृषी विद्यापीठाचे सभागृह खचाखच भरलेले होते. महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार मुख्याध्यापक या अधिवेशनासाठी उपस्थित होते.
सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, उपाध्यक्ष सचिन नलवडे, डॉ. डी.एस. घुगरे, आर.व्ही.पाटील,सचिव नंदकुमार सागर.,प्रवक्ता प्रसाद   गायकवाड, कोषाध्यक्ष संदेश राऊत, सहसंपादक रमेश तरवडेकर , महामंडळाचे स्वरूप पदाधिकारी, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर व सर्व पदाधिकारी, सेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघ व त्यांचे पदाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले.

(प्रसिद्धी विभाग महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई )

Comments

  1. मुख्याध्यापक महामंडळाचा ब्लॉग अतिशय उत्कृष्ट लेखन व छायाचित्रे सह प्रसिद्ध झाल्यामुळे तो महाराष्ट्र भर पोहोचला. गुणवत्ता चांगली असून डॉ बी बी पाटील यांना याचे विशेष श्रेय जाते.

    ReplyDelete
  2. महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली सदर अधिवेशन उत्तम रित्या संपन्न झाले. श्री बी बी पाटीलसर यांनी या platform चा उपयोग करून सर्वांपर्यंत छान माहिती पोहचवली.🌹🙏💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन - यायला लागतय

मुख्याध्यापक महामंडळ 63 वे अधिवेशन संबंधी डिजीटल साहित्य डाऊनलोड करणे साठी लिक